शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘स्वाभिमानी’ करणार उसाचे मार्केटिंग : राजेंद्र गड्यान्नावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:22 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज विभागात कारखानदारांना दराच्या स्पर्धेत उतरण्याचे आवाहनशेतकºयांच्या फायद्यासाठीच ‘स्वाभिमानी’ उसाचे मार्केटिंग करणार कारखान्यांनीही ऊस दराच्या स्पर्धेत उतरावे,

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे यावर्षी प्रतिटन किमान तीन हजार रुपये दर मिळवून देण्यासाठी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना उसाचे मार्केटिंग करणार असून, त्यासाठी गावोगावी जनजागृती मेळावे घेणार आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी दिली.

जिल्ह्यातील कारखानदार आणि संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत एफआरपी अधिक २०० रुपये दर देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील कारखान्यांची ‘एफआरपी’च कमी बसत असल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होणारआहे. म्हणून शेतकºयांच्या फायद्यासाठीच ‘स्वाभिमानी’ उसाचे मार्केटिंग करणार असून, या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी या परिसरातील कारखान्यांनीही ऊस दराच्या स्पर्धेत उतरावे, असे आवाहन केले.

येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संघटनेची भूमिका मांडली. यावेळी गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री, आजरा तालुकाध्यक्ष तानाजीराव देसाई उपस्थित होते. कारखानदारांच्या नादान कारभारामुळेच गडहिंग्लज परिसरातील ऊस उत्पादकांचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.गडहिंग्लज परिसरातील ऊस सर्वाधिक साखर उताºयाचा असूनही कमी गाळप यामुळेचया परिसरातील कारखान्यांचीएफआरपी कमी बसते. मात्र, यंदा परिसरात उसाचे उत्पादन चांगले आहे. जिल्हा पातळीवर ठरलेल्यासूत्रानुसार यावर्षी शेतकºयांना दोन पैसे जादा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी ऊस तोडीची घाई करू नये, असे आवाहनही गड्यान्नावर यांनी यावेळी केले.काही कारखाने संपर्कातगेल्यावर्षीचे गाळप आणि उतारा विचारात घेता गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील सर्व कारखान्यांची ‘एफआरपी’ २५०० ते २६०० रुपयांच्या दरम्यान बसते. मात्र, निपाणीच्या हालसिद्धनाथने ३१५१ दर जाहीर केला असून, संकेश्वरच्या हिरण्यकेशीनेही ३००० रुपये दर दिला आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठीच आम्ही उसाचे मार्केटिंग करणार असून, काही कारखाने आपल्या संपर्कात आहेत, असा दावाही गड्यान्नावर यांनी यावेळी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप